Skip to main content

मायाजाळ-फेसबुक

फेसबुक सुटल, हाे हाे सुटलच. काेणी बाेल्ल का, काेणाला दाखवायच म्हणुन नाहीतर. कंटाळला जीव.

फेसबुकमुळे खुप विचित्र सवयी लागत हाेत्या. तासन् तास ते ५ इंचाच्या स्क्रिनमध्ये डाेक खुपसुन बसायला लागत हाेत. दुसर्‍याच वाकुन बघायची तीव्र इच्छा व्हायची. समाेरच्याच्या प्रत्येक वागण्याला मी लाईक्स आणि कमेन्टनी मापत गेलाे.

लाेक किती छान आयुष्य दाखवतात ना फेसबुकवर, अगदि एखादयाला हेवा वाटावा इतक. निल आर्मस्ट्राँग जसा चंद्रावर जाणारा पहिला माणुस हाेता तस हे पृथ्वीवरच्याच कुठल्यातरी काेपर्‍यात  मीटरभर जावुन चेकइन करत असतात. खाताना साेनंचांदी खाताे असे डिशेसचे फाेटाे टाकताे. मित्रमैत्रीणिंना कधीही स्व:ताहुन मेसेज न करणारे, प्रत्येक फाेटाेत टॅग करायच कधीच विसरत नाहीत.

किती आभासि जगताे ना, तुम्ही काय आणि मी काय आपण सगळयांनी थाेडयाफार फरकाने हेच केलय आणि करत राहु. खरच हयाची गरज आहे का, कधीतरी विचारु स्व:ताला प्रश्‍न. उत्तर नाहीच भेटल तर थाेडया दिवस लांब राहु, मन चलबिचल हाेईल, लक्ष जाईल अॅप कडे, सुंदर सुंदर फाेटाेज टाकायचा माेह हाेईलही. काेणी काय अपलाेड केलय हयाची लालसा हाेईल शेवटी इतक्या दिवसाच्या सवयीच त्या.

पण एकदा का त्याच्या नसण्याची सवय लागली का, खुप वेळ वाचताे. बघा तर त्याच्यापासुन १-२ दिवस लांब राहुन मग कळेल आपण किती आहारी गेलाेय ते. आणि एकमेंकाच्या टच मध्ये राहिला "काॅल्स, मेसेजचे" आॅपश्‍नस आहेतच की.आपण त्याचा वापर करायचा का त्याला आपला वापर करुन दयायचा हयाचा समज तर आपल्याला आहेच.

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)


Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...