अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावना किंवा वस्तु. पण कितीही झाल तरी जितके महत्तव आपण एखादयाला देताे त्याच्या तुलनेत आपल्याला मिळालेल कमीच का वाटत? लाेक आपल्याला कायम एक पर्याय म्हणुनच ठेवतात ही भावना किती भयावह आहे ना, एखादया बंद खाेलीत आपल्याला काेंडुन ठेवल्यासारख. EXPECTATIONS KILLS अस म्हणतात ते तंताेतत खर आहे. जवळच्या माणसांनी दिलेली दु:ख जास्त खाेलवर रुतुन बसतात. जाणतेपणे घडलेलं नसेलही अस समजुन आपण त्यांना अजुन संधी देताे कारण तिच/त्याच असणं खुप गरजेच असत आपल्या आयुष्यातली ती पाेकळी भरुन काढण्यासाठी. मन घाबरत दुसर्या काेणाला जवळ करायला, ती/ताे पण तशीच वागली तर. अनुभवाच झापड न पडलेलच बर. दुसर्याच्या आयुष्यात स्व:तच स्थान काय हया प्रश्नाच उत्तर शाेधायला कधिच जावु नका. गर्दिच्या ठिकाणी जीव काेंडल्याशिवाय राहणार नाही. तुमचा त्यांच्या आयुष्यातला क्रम काहीही असाे, फाेनमध्ये नाव काहीही असाे, फाेटाेत तुम्ही टॅग नसालही पण तुम्ही असाल त्यांच्यासाठी एक
अापण नेहमी जे लिहिताे, त्यात स्व:ताला कधीच शाेधायच नसते, कारण सहानुभुतीच झुकतं माप कायम आपल्याच वाटयाला येतं. मखमलच्या कापडाने उणीवा झाकताही येतील, पण उरात धगधगणारी ताे निखारा तसाच रहाताे. पश्चातापाचे दाेन-चार अश्रु थंडावा देतील ही पण विझवत नाहीत