Skip to main content

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावना किंवा वस्तु.

पण कितीही झाल तरी जितके महत्‍तव आपण एखादयाला देताे त्याच्या तुलनेत आपल्याला मिळालेल कमीच का वाटत? लाेक आपल्याला कायम एक पर्याय म्हणुनच ठेवतात ही भावना किती भयावह आहे ना, एखादया बंद खाेलीत आपल्याला काेंडुन ठेवल्यासारख. EXPECTATIONS KILLS अस म्हणतात ते तंताेतत खर आहे.

जवळच्या माणसांनी दिलेली दु:ख जास्त खाेलवर रुतुन बसतात. जाणतेपणे घडलेलं नसेलही अस समजुन आपण त्यांना अजुन संधी देताे कारण तिच/त्याच असणं खुप गरजेच असत आपल्या आयुष्यातली ती पाेकळी भरुन काढण्यासाठी. मन घाबरत दुसर्‍या काेणाला जवळ करायला, ती/ताे पण तशीच वागली तर. अनुभवाच झापड न पडलेलच बर.

दुसर्‍याच्या आयुष्यात स्व:तच स्थान काय हया प्रश्नाच उत्तर शाेधायला कधिच जावु नका. गर्दिच्या ठिकाणी जीव काेंडल्याशिवाय राहणार नाही. तुमचा त्यांच्या आयुष्यातला क्रम काहीही असाे, फाेनमध्ये नाव काहीही असाे, फाेटाेत तुम्ही टॅग नसालही पण तुम्ही असाल त्यांच्यासाठी एक पर्याय म्हणुन त्यातच आता समाधान मानायला हव.

का जमत नाही आपल्याला दुसर्‍यांसारख वागणं, २४ तासाच घडयाळ अापल्याला पण आहेच की, वेळ मारुन न्यायला का जमत नाही. त्यांना नसेल आपली पर्वा तर का आपण सहानभुतीची अपेक्षा तरी धरावी. येताना एकट आलेलाे आपण गर्दिचा भाग का हाेताे. पाेटाची खळगी भरण्यात झाेकुन दयाव स्वत:ला, गुरफटुन घ्याव स्व:ताला, हवीतेवढी आणि शक्य तितकी मदत करावी एखादयाला, अस्तित्वाला बांधुन ठेवाव स्व:ताच्या अगदि त्या ध्रुवतार्‍यासारख अढळ. दुसर्‍यांच्या आनंदाच कारण बनाव. दुसर्‍या बद्दल मत बनवतांना स्व:तला त्याच्या जागी ठेवुन बघाव, सिध्द करण्याच्या वाटा आपाेआप सापडतात.

आयुष्य खुप सुंदर आहे, जख्मांच एक आहे, त्यांना जास्त कुरवाळल ना की त्या तशाच आेल्या राहतात आणि आपण अजुन कमकुवत हाेत जाताे. आपण समजताे त्यापेक्षाही आपण कितीतरी भक्कम आहाेत शरीराने तरी, मनाच काय ते बाराही महिने आजारी असतच. दु:खाच मुळ कारण आपण वाहिलेल्या अपेक्षा.

आपल्या असल्याचा आनंद ज्यांना नाही त्यांना आपल्या न हाेण्याच दु:ख कधीच हाेणार नाही. तुमची पर्यायी जागा घेणारा काेणीतरी असताेच.

नाही किसीकाे पाने की चाह नाही किसीकाे खाेने का डर|

समीर क्षमा दत्तात्रय कडु, लाेणावळा

Comments

Popular posts from this blog

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले

सरते वर्ष

प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम करतीलच. काही माेरपंखासारखे मखमलित हाेते तर काही निवडुंगाच्या काटयांसारखे तिक्ष्ण, धारधार. अगदि खाेलवर जख्म हाेवुन व्रर्ण साेडणारे. पश्चातापांच्या अश्रुंनी कुस बदलुन कितीतरी रात्री माेठया केल्यात. सकाळचं खाेटं-खाेटं हसु हे राेजच्या जगण्याचा भाग झालाय. मनगटावर अडकवलेल घडयाळ त्याच्या साेयीनुसार नाचवतय. अपेक्षाभंगाच दु:ख स्वत:ला निल्लर्ज आणि हतबल बनवते. आयुष्याची गणितं जुळुन येत नाहीत आणि जबाबदार्‍यांचा पसारा वाढताेय. न घडलेल्या गाेष्टींचा हक्क हा कमनशीबाचा भाग हाेता. खुप सार्‍या तक्रारींचा सुर आळवुन हे वर्ष त्याची कात बदलुन नवीन रुप घेईल. कळत-नकळत ज्यांनी दुखावल त्यांना न मागताच माफी, आणि आपल्यालामुळे जे दुखावलेत त्यांनी क्षमस्व असावे. नवीन वर्षात काय-काय करायच हयाचा संकल्प काही अजुन झालेला नाही, पण काय नाही करायच हयाची मात्र पक्की खुणगाठ मनाशी बांधलेली आहे. सरते शेवटी आलेल्यांना सामाेरे जायचे आणि शहाणपणात वाढ करुन घ्याय

काेपर्डीतली ती

"काेपर्डीतली ती" असाच जुना पेपर चाळताना ती "काेपर्डी"ची बातमी नजरेला आली. सगळ्याच घटना आपण किती पटकन विसरताे ना. आपल्या साेबत प्रसार माध्यमांना सुध्दा वेगवेगळे विषय भेटलेत चघळायला. अस काही झाल का किती चटकन प्रतिक्रिया देताे ना आपण. फेसबुकवर माेठेच्या माेठे रकाने गिरवले, ठळक घडामाेडींमध्ये ती झळकलीही. न्युजरुम मध्ये वाॅर झाले. नेते मंडळींची पायधुळ तिच्या उंबरठयाला लागली. कितीतरी माैर्चे निघाले सगळं समाजमन अगदि ढवळुन निघाले. आम्ही हया व्यतिरिक्त काहीच करु शकत नाही. पुढे काय झाल तुझ्या बाबतीत माहिती नाही. तुझ्या केसची फाईल कुठेतरी अडगळीत धुळ खात असेल. तुझ्या आठवणी विरुन चालल्यात. तुझे घरचे खुप सार्‍या गाेष्टींची झगडत असतील. आम्ही आमच्या खाजगी आयुष्यात खुप व्यस्त आहाेत. राेज पेपरात तुझ्याशी मिळतीजुळती बातमी असतेच. ती ऐकुन आमचं ह्दय पिळवटुन निघतं. चर्चा हाेतात, दिवस पुढे सरकत जाताे आणि काहीच बदलत नाही. मी तर नेहमी ते हाेण्या मागची कारणे शाेधत असताे. डाेक्यात विचारांची रांग लागते. सगळयांसारखाच मी सुध्दा हतबल हाेताे. करणारे सुध्दा आमच्यासारखे साे काॅल्ड पुरुष हाेते