प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम करतीलच. काही माेरपंखासारखे मखमलित हाेते तर काही निवडुंगाच्या काटयांसारखे तिक्ष्ण, धारधार. अगदि खाेलवर जख्म हाेवुन व्रर्ण साेडणारे. पश्चातापांच्या अश्रुंनी कुस बदलुन कितीतरी रात्री माेठया केल्यात. सकाळचं खाेटं-खाेटं हसु हे राेजच्या जगण्याचा भाग झालाय. मनगटावर अडकवलेल घडयाळ त्याच्या साेयीनुसार नाचवतय. अपेक्षाभंगाच दु:ख स्वत:ला निल्लर्ज आणि हतबल बनवते. आयुष्याची गणितं जुळुन येत नाहीत आणि जबाबदार्यांचा पसारा वाढताेय. न घडलेल्या गाेष्टींचा हक्क हा कमनशीबाचा भाग हाेता. खुप सार्या तक्रारींचा सुर आळवुन हे वर्ष त्याची कात बदलुन नवीन रुप घेईल. कळत-नकळत ज्यांनी दुखावल त्यांना न मागताच माफी, आणि आपल्यालामुळे जे दुखावलेत त्यांनी क्षमस्व असावे. नवीन वर्षात काय-काय करायच हयाचा संकल्प काही अजुन झालेला नाही, पण काय नाही करायच हयाची मात्र पक्की खुणगाठ मनाशी बांधलेली आहे. सरते शेवटी आलेल्यांना सामाेरे जायचे आणि शहाणपणात वाढ करुन घ्याय
बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केलं जात वेळप्रसंगी समज किंवा मार देवुन आपल्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला जाताे पण खरच आपल्यात बदल हाेताे का? वडीलधारी माणंस पण वयाचा दाखला देत दुर्लक्ष करतात आणि तिच आपली सवय हाेवुन जाते. जीभेला हाड नसते अस म्हणतात पण तिची धार कुठल्याही शस्त्रापेक्षा कमी नाही. वेळ मिळेल तसा समाेरच्यावर तिने घात करत असताे. समाेरच्याच्या मानसिकतेचा विचार न करता. आपलेच शब्द आपल्याला गाेड वाटु लागतात. समाेरच्यांच्या वेदनांच आपल्याला काही घेण-देणं नसत, आपण फक्त समाेरच्याचा पानउतारा करावा एथेच्छ, अगदी शत्रु असल्यासारखा, खरच अश्या आसुरी आनंदाला काय अर्थ. काही शब्द खरच खाेलवर जख्म करतात अगदि न भरुन येणारी. माणसांबद्दल वाईट मतं कधीच बनवु नका, त्यांने नात्यातली दरी वाढते. जाताना काय साेबत घेवुन जाणार हयाची एकदा यादी करुन बघा, एक जरी वस्तु आपल्या यादित आली तर जीवनाच सार्थक हाेईल. का करावा इतरांचा द्वेष, मत्सर, लाेभ, त्यांनी आप