बाेलताना खरच विचार करावा का??
नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही.
लहान असताना बालिश म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केलं जात वेळप्रसंगी समज किंवा मार देवुन आपल्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला जाताे पण खरच आपल्यात बदल हाेताे का? वडीलधारी माणंस पण वयाचा दाखला देत दुर्लक्ष करतात आणि तिच आपली सवय हाेवुन जाते.
जीभेला हाड नसते अस म्हणतात पण तिची धार कुठल्याही शस्त्रापेक्षा कमी नाही. वेळ मिळेल तसा समाेरच्यावर तिने घात करत असताे. समाेरच्याच्या मानसिकतेचा विचार न करता. आपलेच शब्द आपल्याला गाेड वाटु लागतात. समाेरच्यांच्या वेदनांच आपल्याला काही घेण-देणं नसत, आपण फक्त समाेरच्याचा पानउतारा करावा एथेच्छ, अगदी शत्रु असल्यासारखा, खरच अश्या आसुरी आनंदाला काय अर्थ.
काही शब्द खरच खाेलवर जख्म करतात अगदि न भरुन येणारी. माणसांबद्दल वाईट मतं कधीच बनवु नका, त्यांने नात्यातली दरी वाढते. जाताना काय साेबत घेवुन जाणार हयाची एकदा यादी करुन बघा, एक जरी वस्तु आपल्या यादित आली तर जीवनाच सार्थक हाेईल.
का करावा इतरांचा द्वेष, मत्सर, लाेभ, त्यांनी आपल्याशी अस वागलं म्हणुन आपण पण त्यांच्याशी तसच वागावं का. प्रत्येकजण कशाशी ना कशाशी झगडताेय त्यात आपल्या नाहक वागण्याची भर का??
ऐशाेरामात खुशाल जगाव, भमंकपणा असावा. पण वागण्यातला दाेष साेबत घेवुन, कुठपर्यंत टिकणार ते??
लहान असताे तेव्हा सगळे आपल्याला हवे असतात, अगदि सगळेच. चाॅकलेट, आईस्क्रीम किंवा एखाद खेळणं हयांची अपेक्षा उराशी धरुन आपण त्यांच्यावर निरागस प्रेम करत असताे. वाढत्या वयात आपल्याला मित्रमैत्रीणी भेटतात, जगण्याच्या कक्षा त्यांच्यामुळे पसरतात. आपण गुरफटुन जाताे, नातेवाईक फक्त शुभेच्छा देण्यापुरते उरतात. आपल्यावर असणार्या जबाबदार्या त्याला कारणीभुत असतीलही पण त्यांच्याबद्दलच्या असलेल्या गैरसमजाच्या राेगाच काय. मित्रमैत्रीणींची निवड तुम्ही करु शकता पण रक्ताची नाती नशीबानेच मिळतात ती टिकवण्याचा प्रयत्न खरच हाेताे का? दुसर्याला कमी लेखण्याचा दाेष आपल्यातुन खरच जाईल??
सहन करणारा नेहमीच लाचार नसताे की शब्दांचा वापर त्याला येत नाही पण समाेरच्या अहंकारापेक्षा समाेरचा व्यक्ती जास्त प्रिय असताे. झालेला अपमान सहन करण्याची ताकद आपल्या शब्दांच्या धारेपेक्षा नक्कीच जास्त असते.
खरच विचार करावा, कळत-नकळत, जाणुन बाेलताना, कारण अापण सहज बाेलुन जाताे पण समाेरच्याच्या काळजावर शब्दन शब्द काेरला जाताे. काही शब्द इतके खाेलवर रुततात की पश्चातांपाचे कितीतरी अश्रु त्यांच दु:ख नाही शमवु शकत.
तुमच्या शब्दांना फक्त माफी मिळु शकते, पण ते विसरणं अवघड आहे.
समीर क्षमा दत्तात्रय कडु, लाेणावळा
Worth following, the sharpest tool is tongue ...
ReplyDelete