Skip to main content

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का??
नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही.

लहान असताना बालिश म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केलं जात वेळप्रसंगी समज किंवा मार देवुन आपल्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला जाताे पण खरच आपल्यात बदल हाेताे का? वडीलधारी माणंस पण वयाचा दाखला देत दुर्लक्ष करतात आणि तिच आपली सवय हाेवुन जाते.

जीभेला हाड नसते अस म्हणतात पण तिची धार कुठल्याही शस्त्रापेक्षा कमी नाही. वेळ मिळेल तसा समाेरच्यावर तिने घात करत असताे. समाेरच्याच्या मानसिकतेचा विचार न करता. आपलेच शब्द आपल्याला गाेड वाटु लागतात. समाेरच्यांच्या वेदनांच आपल्याला काही घेण-देणं नसत, आपण फक्त समाेरच्याचा पानउतारा करावा एथेच्छ, अगदी शत्रु असल्यासारखा, खरच अश्या आसुरी आनंदाला काय अर्थ.

काही शब्द खरच खाेलवर जख्म करतात अगदि न भरुन येणारी. माणसांबद्दल वाईट मतं कधीच बनवु नका, त्यांने नात्यातली दरी वाढते. जाताना काय साेबत घेवुन जाणार हयाची एकदा यादी करुन बघा, एक जरी वस्तु आपल्या यादित आली तर जीवनाच सार्थक हाेईल.

का करावा इतरांचा द्वेष, मत्सर, लाेभ, त्यांनी आपल्याशी अस वागलं म्हणुन ‍आपण पण त्यांच्याशी तसच वागावं का. प्रत्येकजण कशाशी ना कशाशी झगडताेय त्यात आपल्या नाहक वागण्याची भर का??

ऐशाेरामात खुशाल जगाव, भमंकपणा असावा. पण वागण्यातला दाेष साेबत घेवुन, कुठपर्यंत टिकणार ते??

लहान असताे तेव्हा सगळे आपल्याला हवे असतात, अगदि सगळेच. चाॅकलेट, आईस्क्रीम किंवा एखाद खेळणं हयांची अपेक्षा उराशी धरुन आपण त्यांच्यावर निरागस प्रेम करत असताे. वाढत्या वयात आपल्याला मित्रमैत्रीणी भेटतात, जगण्याच्या कक्षा त्यांच्यामुळे पसरतात. आपण गुरफटुन जाताे, नातेवाईक फक्त शुभेच्छा देण्यापुरते उरतात. आपल्यावर असणार्‍या जबाबदार्‍या त्याला कारणीभुत असतीलही पण त्यांच्याबद्दलच्या असलेल्या गैरसमजाच्या राेगाच काय. मित्रमैत्रीणींची निवड तुम्ही करु शकता पण रक्ताची नाती नशीबानेच मिळतात ती टिकवण्याचा प्रयत्न खरच हाेताे का? दुसर्‍याला कमी लेखण्याचा दाेष आपल्यातुन खरच जाईल??

सहन करणारा नेहमीच लाचार नसताे की शब्दांचा वापर त्याला येत नाही पण समाेरच्या अहंकारापेक्षा समाेरचा व्यक्ती जास्त प्रिय असताे. झालेला अपमान  सहन करण्याची ताकद आपल्या शब्दांच्या धारेपेक्षा नक्कीच जास्त असते.

खरच विचार करावा, कळत-नकळत, जाणुन बाेलताना, कारण अापण सहज बाेलुन जाताे पण समाेरच्याच्या काळजावर शब्दन शब्द काेरला जाताे. काही शब्द इतके खाेलवर रुततात की पश्चातांपाचे कितीतरी अश्रु त्यांच दु:ख नाही शमवु शकत.

तुमच्या शब्दांना फक्त माफी मिळु शकते, पण ते विसरणं अवघड आहे.

समीर क्षमा दत्तात्रय कडु, लाेणावळा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले

सरते वर्ष

प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम करतीलच. काही माेरपंखासारखे मखमलित हाेते तर काही निवडुंगाच्या काटयांसारखे तिक्ष्ण, धारधार. अगदि खाेलवर जख्म हाेवुन व्रर्ण साेडणारे. पश्चातापांच्या अश्रुंनी कुस बदलुन कितीतरी रात्री माेठया केल्यात. सकाळचं खाेटं-खाेटं हसु हे राेजच्या जगण्याचा भाग झालाय. मनगटावर अडकवलेल घडयाळ त्याच्या साेयीनुसार नाचवतय. अपेक्षाभंगाच दु:ख स्वत:ला निल्लर्ज आणि हतबल बनवते. आयुष्याची गणितं जुळुन येत नाहीत आणि जबाबदार्‍यांचा पसारा वाढताेय. न घडलेल्या गाेष्टींचा हक्क हा कमनशीबाचा भाग हाेता. खुप सार्‍या तक्रारींचा सुर आळवुन हे वर्ष त्याची कात बदलुन नवीन रुप घेईल. कळत-नकळत ज्यांनी दुखावल त्यांना न मागताच माफी, आणि आपल्यालामुळे जे दुखावलेत त्यांनी क्षमस्व असावे. नवीन वर्षात काय-काय करायच हयाचा संकल्प काही अजुन झालेला नाही, पण काय नाही करायच हयाची मात्र पक्की खुणगाठ मनाशी बांधलेली आहे. सरते शेवटी आलेल्यांना सामाेरे जायचे आणि शहाणपणात वाढ करुन घ्याय

काेपर्डीतली ती

"काेपर्डीतली ती" असाच जुना पेपर चाळताना ती "काेपर्डी"ची बातमी नजरेला आली. सगळ्याच घटना आपण किती पटकन विसरताे ना. आपल्या साेबत प्रसार माध्यमांना सुध्दा वेगवेगळे विषय भेटलेत चघळायला. अस काही झाल का किती चटकन प्रतिक्रिया देताे ना आपण. फेसबुकवर माेठेच्या माेठे रकाने गिरवले, ठळक घडामाेडींमध्ये ती झळकलीही. न्युजरुम मध्ये वाॅर झाले. नेते मंडळींची पायधुळ तिच्या उंबरठयाला लागली. कितीतरी माैर्चे निघाले सगळं समाजमन अगदि ढवळुन निघाले. आम्ही हया व्यतिरिक्त काहीच करु शकत नाही. पुढे काय झाल तुझ्या बाबतीत माहिती नाही. तुझ्या केसची फाईल कुठेतरी अडगळीत धुळ खात असेल. तुझ्या आठवणी विरुन चालल्यात. तुझे घरचे खुप सार्‍या गाेष्टींची झगडत असतील. आम्ही आमच्या खाजगी आयुष्यात खुप व्यस्त आहाेत. राेज पेपरात तुझ्याशी मिळतीजुळती बातमी असतेच. ती ऐकुन आमचं ह्दय पिळवटुन निघतं. चर्चा हाेतात, दिवस पुढे सरकत जाताे आणि काहीच बदलत नाही. मी तर नेहमी ते हाेण्या मागची कारणे शाेधत असताे. डाेक्यात विचारांची रांग लागते. सगळयांसारखाच मी सुध्दा हतबल हाेताे. करणारे सुध्दा आमच्यासारखे साे काॅल्ड पुरुष हाेते